Sunday, September 29, 2019

सापांचे चमत्कारी विश्व


सापांचे चमत्कारी विश्व

साप म्हटले कि अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय रहात नाही. साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सापांचे हे सरपटणारे जीव असून त्यांना कुठल्याहीप्रकारचे हात अथवा पाय नसतात.  सापांना हात व पाय नसल्याने ते जमीनीवर नागमोडी आकारात सरपटतात. सापांबद्द्ल बद्दल माणसाला नेहमीच कुतूहल आणि भीती वाटते. त्याचे कारण म्हणजे त्यांचे विष आणि अनेक गैरसमज. साप चावाल्यानतर मृत्य अटळ असतो अशी दृढ भावना माणसाच्या मनामध्ये खोलवर रुजली आहे. माणसासाठी सापांचे विश्व हे अत्यंत गूढ आहे. अनेक चमत्कार व गैरसमज सापाशी जोडले गेले आहेत.  सापांविषयी अचूक ज्ञान नसणे हे अनेक गैरसमजापैकी एक कारण आहे. खऱ्या अर्थाने साप हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. कारण पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करणारे उंदीर हे सापांचे प्रमुख अन्न आहे. असे म्हणतात की, पाच एकर क्षेत्रात एखादा साप वावरत असेल तर त्या क्षेत्रात एक हि उंदीर शिल्लक रहात नाही. परंतु प्रत्येक साप विषारी असतो असा समज असल्यामुळे नाहक भीती बाळगली जाते.  सर्वच साप विषारी नसतात. त्यातील काही सापांमुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नेहमीच संशयास्पद वाटतो. दरवर्षी हजारो माणसे सर्पदंशाने मरतात. असे असले तरी सर्वच साप विषारी नसतात केवळ थोड्याच जाती विषारी आहेत. भारतात नाग, घोणस, फुरसे व मन्यार या चार प्रमुख जाती विषारी साप म्हणून ओळखल्या जातात. त्यासाठी आपण विषारी व बिन-विषारी सापांची माहिती जाणून घेणार आहोत.  

No comments:

Post a Comment